दिग्दर्शक - मार्क वेब
IMDB : http://www.imdb.com/title/tt1022603/
बॉलीवूडची सर्वात घासुन गुळगुळीत झालेली कहाणी कोणती? दोन जीवांच प्रेम.. त्यात मुलगा प्रेमावर विश्वास न ठेवणारा.. आणि मुलगी प्रेमावर आंधळा विश्वास ठेवणारी... सरतेशेवटी मुलाचाही प्रेमावर विश्वास बसणार आणि गोष्ट सफळ संपुर्ण होणार.. ह्याच बॉलीवूडी कंसेप्टवर आधारीत असणारा पण वेगळेपण जपणारा '५०० डेज ऑफ समर' हा हॉलीवूडी चित्रपट एक सुंदर रोमॅन्टीक ड्रामा आहे.
ह्यात नायक टॉम प्रेमावर विश्वास ठेवणारा असतो, तर नायिका समर ही प्रेमावर विश्वास न ठेवणारी असते. समरला नाती, त्यानंतर येणारी जवाबदारी, होणारी फसवणुक मंजुर नसते. टॉम हा आर्कीटेक्टचं शिक्षण घेतलेला पण पोटासाठी ग्रीटींग कार्ड बनविणार्या कंपनीत काम करणारा असतो. तिथे त्याची ओळख समर हिच्याशी होते....पहाताक्षणीच त्याचं प्रेम तिच्यावर जडतं.... पण समरचा प्रेमावर, नात्यांवर विश्वास नसतो...
प्रेम आणि नातं यावरुन दोघात वाद होतात तरीही केवळ सोबत असताना चांगले वाटत असल्यामुळे त्यांची जवळीक कायम राहते, पण अशाच एका वादामुळे ते दुरावतात.. टॉमला याची टोचणी राहते.. समर तो जॉब सोडते.
एका जुन्या कलीगच्या लग्नाला जाताना प्रवासात टॉम आणि समर भेटतात. परत थोडेसे जवळ येतात, तिथेच समर टॉमला घरी पार्टीसाठी बोलावते. त्या पार्टीत टॉम समरकडे जातो पण तिच्या बोटात एंगेजमेंट अंगठी पाहुन तिथुन निघुन जातो. अतिशय विमन्सक अवस्थेत जॉब सोडतो आणि दारूच्या आहारी जातो.
मग हळूहळू स्वतःला सावरून आपल्या आर्कीटेक्ट विषयाकडे वळतो व त्या क्षेत्रात नौकरी शोधायला लागतो..
इथे कथा सरळ सांगितली असली तरी चित्रपटात ती उलट सुलट दाखविली आहे. टॉम आणि समरचे हे संबंध ५०० दिवस चालतात (५०० डेज ऑफ समर म्हणुन चित्रपटाचे नाव). चित्रपटात आधी दिवसाचा नंबर देऊन त्यादिवशीची कथा दाखविली आहे... ही नॉन लिनीअर मांडणी छान वाटते, मुख्य इथे जुळते.
चित्रपटात टॉम आणि समर निभावलेले कलाकार जोसेफ गॉर्डोन आणि झोयी सुंदर भुमिका करतात. झोयी तर अप्रतिम, समरच्या भुमिकेत अगदी फिट्ट. दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे, प्रेमात असताना 'होम सेंटर' टाईप मॉलमध्ये फिरताना नविन जोडप्याप्रमाणे तिथेच काल्पनिक संसार मस्त रंगविला आहे.. मजा येते ते पाहताना. प्रेम जुळल्यावर टॉमवर अगदी टिपिकल बॉलीवूड पटांप्रमाणे एक गाणे चित्रीत केले आहे, रस्त्यावर तो गाणे गातो, रस्त्यावरचे लोकं त्यात सामिल होतात वगैरे... हॉलीवूडच्या हिरोवर हे गाणं वेगळंच वाटतं..
सिनेमा संपतो सुद्धा एका गोड शेवटासहीत, पाहणेबल आहे.
Showing posts with label २००९. Show all posts
Showing posts with label २००९. Show all posts
Sunday, 13 June 2010
Monday, 15 February 2010
हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९)
दिग्दर्शक - परेश मोकाशी.
ऑस्करसाठी या वर्षीचा भारतातर्फेची अधिकृत प्रवेशिका असलेला बहुचर्चीत मराठी चलचित्रपट ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ पाहण्याचा योग आला.
भारतिय चित्रपट सृष्टीचे जनक असणार्या दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट बनविण्याच्या प्रवास म्हणजे हा चित्रपट.
वर्ष १९११, इंग्रजांच्या राजवटीत केळफा (फाळके) इंग्लंडचा ख्रिस्तावरिल मुकपट पाहुन प्रभावित होतात आणि भारतात मुकपट उद्योग सुरु करायचा असा चंग बांधतात.
पण हे सगळे इतके सोपे नसते. प्रिंटींगप्रेसचा धंदा सोडलेल्या फाळक्यांच्या घरात पैसे नसतात, मात्र अजोड चिकाटी आणि महत्वकांक्षा असते. घरातील पै-नी-पै गोळा करुन आणि वर घरातील सामान विकुन ते या विषयीचा अभ्यास करतात आणि एक प्रोजेक्टर विकत घेतात (ज्यात फक्त फोटो पहायची सोय असते).
मुकपटाविषयी अधिक माहीती करुन घ्यावी यासाठी ते लंडनला जायचा बेत करतात व त्यासाठी कर्ज काढतात, वर बायकोचे दागीने गहाण टाकतात. लंडनला जाउन तिथे चित्रपटावर लिहिणार्या मासिकाच्या ऑफिसात जाउन सरळ चित्रपट निर्मितीविषयी माहीती घेतात, आणि भारतात परत येवुन पहिल्या मुकपट बनविण्याच्या तयारित लागतात.
लंडनहुन कॅमेरा येतो, आणि मग कुठला मुकपट बनवावा यावर विचार सुरु होतो, मग ते राजा हरिश्चंद्रावर मुकपट बनविण्याचे ठरवितात, त्यानुसार कलाकारांसाठी शोध सुरु होतो, आणि अनेक अडथळ्यांसहीत चित्रपट पुर्ण होतो. पहिल्या एक-दोन दिवसात फारसा प्रतिसाद मिळत नाही, मग गल्लोगल्ली जाहीरात वगैरे करुन, आणि लकी ड्रॉ सारख्या योजना चालवुन अखेरीस मुकपट प्रचंड यशस्वी होतो. यानंतर फाळके अनेक धार्मिक चित्रपटांची निर्मीती करतात.
फाळकेंचा चित्रपट युरोपात सुद्धा प्रदर्शीत होतो, आणि इंग्रंजांकडुन प्रशंसा होते, तिथे चित्रपट बनविण्याचे त्यांना आमंत्रण मिळते पण फाळके ते सोडुन मायदेशात चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी भारतात परत येउन चित्रपट निर्मिती चालु ठेवतात...
हा प्रवास चित्रपटात विनोदी अंगाने सादर केला आहे. तारामतीच्या भुमिकेसाठी स्त्री कलाकार शोधण्यासाठीचा शोध आणि प्रत्यक्ष मुकपटाच्या निर्मिती दरम्यानचे सिन तर झकास जमले आहेत. स्त्री पात्र साकारणार्या कलाकारांची मिशी कापण्यास केलेली टाळाटाळ, कारण केवळ बाप मेल्यावर मिशी काढतात असे समज...त्यावर दादासाहेबांचे स्पष्टीकरण वगैरे सिन्स अत्यंत मनोरंजक.
परेश मोकाशींचे दिग्दर्शन सुरेख आहे, तांत्रीक बाजु अगदी उत्तम आहेत. १९११-१९१५ चा काळ सुरेखपणे उभा केला गेला आहे, यासाठी नितिन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाची मोलाची साथ मिळाली आहे. मला विशेष आवडलं ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, आनंद मोडक आणि नरेंद्र भिडे यांचे खास अभिनंदन. प्रत्येक कलाकाराचा अभिनय उत्तम झाला आहे, फाळके झालेले नंदु माधव आणि त्यांच्या पत्नी असलेल्या विभावरी देशपाण्डे यांचे तर विशेष कौतुक. युटीवी सारख्या भक्कम निर्मिती संस्थेमुळे चित्रपटाचा स्टॅण्डर्ड अतिशय छान आहे...बघावाच असा...
ऑस्करसाठी या वर्षीचा भारतातर्फेची अधिकृत प्रवेशिका असलेला बहुचर्चीत मराठी चलचित्रपट ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ पाहण्याचा योग आला.
भारतिय चित्रपट सृष्टीचे जनक असणार्या दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट बनविण्याच्या प्रवास म्हणजे हा चित्रपट.
वर्ष १९११, इंग्रजांच्या राजवटीत केळफा (फाळके) इंग्लंडचा ख्रिस्तावरिल मुकपट पाहुन प्रभावित होतात आणि भारतात मुकपट उद्योग सुरु करायचा असा चंग बांधतात.
पण हे सगळे इतके सोपे नसते. प्रिंटींगप्रेसचा धंदा सोडलेल्या फाळक्यांच्या घरात पैसे नसतात, मात्र अजोड चिकाटी आणि महत्वकांक्षा असते. घरातील पै-नी-पै गोळा करुन आणि वर घरातील सामान विकुन ते या विषयीचा अभ्यास करतात आणि एक प्रोजेक्टर विकत घेतात (ज्यात फक्त फोटो पहायची सोय असते).
मुकपटाविषयी अधिक माहीती करुन घ्यावी यासाठी ते लंडनला जायचा बेत करतात व त्यासाठी कर्ज काढतात, वर बायकोचे दागीने गहाण टाकतात. लंडनला जाउन तिथे चित्रपटावर लिहिणार्या मासिकाच्या ऑफिसात जाउन सरळ चित्रपट निर्मितीविषयी माहीती घेतात, आणि भारतात परत येवुन पहिल्या मुकपट बनविण्याच्या तयारित लागतात.
लंडनहुन कॅमेरा येतो, आणि मग कुठला मुकपट बनवावा यावर विचार सुरु होतो, मग ते राजा हरिश्चंद्रावर मुकपट बनविण्याचे ठरवितात, त्यानुसार कलाकारांसाठी शोध सुरु होतो, आणि अनेक अडथळ्यांसहीत चित्रपट पुर्ण होतो. पहिल्या एक-दोन दिवसात फारसा प्रतिसाद मिळत नाही, मग गल्लोगल्ली जाहीरात वगैरे करुन, आणि लकी ड्रॉ सारख्या योजना चालवुन अखेरीस मुकपट प्रचंड यशस्वी होतो. यानंतर फाळके अनेक धार्मिक चित्रपटांची निर्मीती करतात.
फाळकेंचा चित्रपट युरोपात सुद्धा प्रदर्शीत होतो, आणि इंग्रंजांकडुन प्रशंसा होते, तिथे चित्रपट बनविण्याचे त्यांना आमंत्रण मिळते पण फाळके ते सोडुन मायदेशात चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी भारतात परत येउन चित्रपट निर्मिती चालु ठेवतात...
हा प्रवास चित्रपटात विनोदी अंगाने सादर केला आहे. तारामतीच्या भुमिकेसाठी स्त्री कलाकार शोधण्यासाठीचा शोध आणि प्रत्यक्ष मुकपटाच्या निर्मिती दरम्यानचे सिन तर झकास जमले आहेत. स्त्री पात्र साकारणार्या कलाकारांची मिशी कापण्यास केलेली टाळाटाळ, कारण केवळ बाप मेल्यावर मिशी काढतात असे समज...त्यावर दादासाहेबांचे स्पष्टीकरण वगैरे सिन्स अत्यंत मनोरंजक.
परेश मोकाशींचे दिग्दर्शन सुरेख आहे, तांत्रीक बाजु अगदी उत्तम आहेत. १९११-१९१५ चा काळ सुरेखपणे उभा केला गेला आहे, यासाठी नितिन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाची मोलाची साथ मिळाली आहे. मला विशेष आवडलं ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, आनंद मोडक आणि नरेंद्र भिडे यांचे खास अभिनंदन. प्रत्येक कलाकाराचा अभिनय उत्तम झाला आहे, फाळके झालेले नंदु माधव आणि त्यांच्या पत्नी असलेल्या विभावरी देशपाण्डे यांचे तर विशेष कौतुक. युटीवी सारख्या भक्कम निर्मिती संस्थेमुळे चित्रपटाचा स्टॅण्डर्ड अतिशय छान आहे...बघावाच असा...
Labels:
२००९,
ऑस्कर,
नंदू माधव,
परेश मोकाशी,
मराठी,
विभावरी देशपाण्डे
Subscribe to:
Posts (Atom)

